कोल्हापूर : मेरी कोई खता तो साबीत कर, बुरे है तो बरा साबीत कर, तुझे चाहा है, कितना तू क्या जाने, चल हम बेवाफा ही सही, तू अपनी वफा तो साबीत कर,” असा थेट हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला होता.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेरो-शायरीच्या माध्यमातून टीका केली होती.
यावर बोलताना आ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शायरीच्या माध्यमातून शरद पवार यांना आव्हान देण्यात आलं की, तुम्ही इमानदार आहात, हे सिद्ध करा. यांना शायरी किती समजते, हे मला माहिती नाही. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगण्याएवढी तुमची लायकी आहे का?”
“हातवारे करून शायरी म्हणायला मजा येते. पण, शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला महाराष्ट्र पडला आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
एकीकडं लोकशाही आणि स्वाभिमानाची ग्वाही द्यायची. ज्यांनी तुमच्याबरोबर हयात घालवली त्यांच्यावर बोलायचं. तुम्ही जीव द्यायला लावला असता, तर दिला असता. पण, काही जणांचे मतदारसंघ सांभाळायचे म्हणून असा दुर्दैवी निर्णय घेतला,” अशी टीका धनंजय मुंडेंनी शरद पवार यांच्यावर केली.
Post a Comment