संगमनेर : खासदार संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करुन कोट्यवधींची माया गोळा केली, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर साखर कारखाना प्रकरणात आरोप केले. त्यांनी संगमनेरमधील पत्रकार परिषदेत परिषदेत उत्तर दिले.
विखे म्हणाले की संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे. त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे त्याच्या टीकेला कुठे महत्व देता? असं विखे पाटील यांनी म्हटले आहे.
कोव्हिडच्या काळात एका बाजूला लोक मृत्यूशी झुंजत होते, मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात ज्याने धन्यता मानली तो संजय राऊत आहे, असे ते म्हणाले.
Post a Comment