पालकमंत्री म्हणून रहा, मालक असल्यासारखे वागू नका...

संगमनेर : पालकमंत्री म्हणून रहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना दिला.


थोरात म्हणाले की, 
तालुक्यातील अधिकारी व  कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. 

संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचार्‍यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार्‍या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.

संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने त्यांचा राग मी समजू शकतो. धाक दपटशा आणि दादागिरी करूनही संगमनेरची जनता वाकायला तयार नाही, त्यामुळे त्यांच्यात वैफल्यग्रस्त भावना तयार झाली आहे. 

दुसरीकडे तलाठी भरती, वाळू धोरण याचा पुरता बोजवारा उडाला, लम्पी आजार थांबलेला नाही तो उलट वाढतो आहे. त्यामुळे आपला राग काढायला ते संगमनेरमध्ये येतात. मात्र येथे येऊन दहशतीची भाषा करणार असाल तर जनता सहन करणार नाही.

तालुक्यातील अधिकारी व  कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post