नगर ः विधानसभा निवडणूक अजूनही अवधी असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी गटाकडून आमदार राहुल जगताप यांचे नाव फायनल मानले जात असून भाजपतर्फे आमदार बबनराव पाचपुते की त्यांच्या कुटुंबातील इतर कोणाला संधी मिळते. त्यामुळे ही लढत जिल्ह्यात चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत पाचपुते यांना विजयी करण्यासाठी पाचपुते यांचे दोन्ही मुले प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. तसेच राहुल जगताप स्वतःचा स्वतःसाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक या वेळी चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत घनश्याम शेलारही आवाहन देणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस होणार आहे. त्यामुळे विकास कामांबरोबरच जनसंपर्क ही या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. पक्षापेक्षा व्यक्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीची लढत होणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे.
राष्ट्रवादी,बीआरएसचे उमेदवार निश्चित जाहीर झालेले आहेत. मात्र भाजपतर्फे बबनराव पाचपुते हेच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. आमदार बबनराव पाचपुते तब्बेतीमुळे आगामी निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र ही फक्त चर्चा राहणार असून बबनराव पाचपुतेच ही निवडणूक लढविणार आहेत.
निवडणुकीच्या प्रचारकामात विक्रम पाचपुते व प्रताप पाचपुते हे प्रचाराची धुरा संभाळणार आहेत. या वेळच्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांना सदाअण्णा पाचपुते यांची उणिव भासणार आहे. विधानसभेच्या अगोदर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक झाल्यास या दोन्ही विधानसभेच्या उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरून या भागाचे नेतृत्व करणार आहे. या दोन्हीही उमेदवार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
माजी आमदार राहुल जगताप हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे जगताप व पाचपुते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरतील हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मदते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळवून देईल. अन्यथा उमेदवारी सोडील, असे वक्तव्य राहुल जगताप यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांचा तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Post a Comment