नगर ः आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच जिल्ह्यातील इच्छुकांसह विद्यमानांना सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांची आठवण झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिवाळी फराळाचा कार्यक्रम दणक्यात झालेला आहे. या दणक्याची जिल्हाभर चर्चा झाली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मागील तीन वर्षे जिल्ह्यातील दिवाळी फराळ कार्यक्रम कमी प्रमाणात आयोजित करण्यात आलेले होते. मात्र आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मागील वर्षापासूनच दिवाळी फराळ कार्यक्रम सुरु करण्यात आलेले आहेत. यंदा हेच कार्यक्रम दणक्यात साजरे करून अनेकांनी शक्ती प्रदर्शन केले.
नेत्यांच्या या शक्तीप्रदर्शनात कार्यक्रर्त्यांना मात्र चांगलीच एक दिवसाची मेजवाणी मिळाली असली तरी सकाळी एकाकडे व दुपारी दुसऱ्याकडे अशा पध्दतीने सर्वसामान्यांसह काही नाराज कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळाचा आनंद लुटला आहे. त्यांच्या या आनंदाचे दुःख मात्र काही नेते मंडळींना झालेले आहेत.
\ही आगामी काळात धोक्याची घंटा असल्याचे नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे नाराजांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरु केलेले आहे. नेत्यांच्या दिवाळ फराळ कार्यक्रमात काहींनी आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊन काही नेत्यांनी आपलीच टिमकी वाजवून घेतली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक आपणच उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केलेले आहे. यावरून जिल्ह्यात राजकीय चर्चांना वेग आलेला आहे. जिल्ह्यात अनेकांना खासदार व आमदार होण्याचे स्वप्न पडत असले तरी पक्षांनी अशा स्वप्न पहाणाऱ्यांना शब्द दिलेला नाही. मात्र हीच मंडळी आगामी काळात आपणच उमेदवार असून असे भासवून आपले वजन वाढवून घेत आहेत.
मात्र पक्षाच्या ज्येष्ठ नेते मंडळींकडून अद्याप संबंधितांच्या नावाबाबत काही चर्चा झालेली नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष आतापासून सुरु झालेला असून एकमेकाला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकाचा चांगल्याजच चुरशीच्या होणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसून येत आहेत.
Post a Comment