नगर ः जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष रात्रं-दिवस सुरु आहे. विविध शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांची ड्युटीसाठी नियुक्ती केली जात आहे. या कक्षात सर्वच कर्मचारी विना तक्रार आपले कर्तव्य बजावत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामध्ये कर्तव्य बजावण्यासाठी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. या कक्षातील कर्तव्यासाठी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये काही कर्मचार्यांना या ड्युटीतून काहींना सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे इमाने इतबारे काम करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असून त्यांना वारंवार आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात ड्युटी करावी लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्यांची नियुक्तीसाठी सर्वच विभागाकडून यादी मागवली जाते. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित कर्मचार्यांच्या ड्युटीची तारीखा दिल्या जात आहेत. त्या तारखेला कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात कर्तव्य बजवायचे असते.
हे काम जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मात्र या कामातून काहींनी आपल्या संघटनात्मकपद व राजकीय वजन वापरून त्यातून सुटका मिळवलेली आहे. त्यामुळे आता नवीन कर्मचाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नियुक्ती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने मुख्यालयात कर्तव्यव बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात कर्तव्य न बजावलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांना आगामी काळात नियुक्ती द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. जे इमाने इतबारे काम करतात त्यांच्यावर प्रशासनाने सुरु असलेला अन्याय त्वरीत थांबवावा, अशी मागणी होत आहे. (क्रमशः)
Post a Comment