नगर ः राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागातील बसस्थानकांमध्ये असलेल्या अस्थापनांमध्ये अनाधिकृत व्यवसाय वाढलेले आहे. त्याकडे मात्र एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले आहे.यावर ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र कारवाई केली जात नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण हो आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना बसस्थानकांमध्ये सुविधा मिळाव्यात म्हणून गाळे उभारण्यात आलेले आहे. ही सर्व गाळे भाडेतत्वावर देऊन त्या माध्यमातून प्रवाशांना चांगली सोय व्हावी, यासाठी एसटी प्रशासन प्रयत्न करीत आहे. राज्यातील अनेक बसस्थानांमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत असून स्वस्त नाष्टा व जेवणासह अन्य पदार्थ मिळत आहे. मात्र अहमदनगर विभागाअंतर्गत 11 आगार असून अनेक बसस्थानके येत आहेत. या बसस्थानकांमध्ये प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ज्युस सेंटरमध्ये प्रवाशांना नाष्टा सेंटर पहायला मिळत आहे. फ्रुट सेंटरमध्ये स्टेशनरी दुकान सुरु झालेले आहे. पुस्तके विक्रीसाठी असलेल्या स्टाॅलऐवजी आता तेथे नाष्टासेंटर सुरु झालेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकांमध्ये बस येईपर्यंत टाईपपास करण्यासाठी वाचनाला काही मिळत नाही. याबाबत अनेकांनी स्थानिक कंट्रोल केबीनला तक्रार केलेली आहे. मात्र या तक्रारींचील दखल मात्र घेण्यात आलेली नाही. काहींनी तर थेट विभागनियंत्र कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केलेली आहे. परंतु या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आलेली असल्याची चर्चा सध्या प्रवाशांमध्ये सुरु आहे.
दरम्यान, बसस्थानकांमध्ये स्वच्छतागृहात महिलांकडून पैेसे घेऊन नये, असा स्पष्ट आदेश आहे. मात्र नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक बसस्थानकावर महिलांकडून पैसे घेतले जात आहे. याबाबतही एसटी प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित स्वच्छता गृह चालकाकडून आम्हाला पाणी विकत घ्यावे लागते, त्यासाठी आम्ही पैसे घेतो, असे सांगत आहे. त्यामुळे या प्रश्नी एसटी प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीद वाक्य असलेल्या एसटी प्रशासनाकडून मात्र प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक बसस्थाकांमध्ये नागरिकांना जेवणासह नाष्टाही व्यवस्थित मिळत नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकार्यांच्या भेटी होऊन संबंधितांना सूचना दिल्या जातात. मात्र या सूचना रात्रीच्या पार्ट्यांसाठी महत्वाच्या ठरतात. त्यामुळे आता प्रवाशांनीही तक्रारी करणे बंद केलेले आहे. तक्रारी केल्यानंतर कारवाई होण्याऐवजी एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चंगल होत असल्याची चर्चा एसटीच्या वर्तुळात सुरु आहे.
Post a Comment