श्रीगोंद्यातील भाजपची ताकद महाविकास आघाडीच्या गोटात

नगर ः मागील पाच वर्षात जिरवाजिवरीचे राजकारण झालेले आहे. या राजकारणाला श्रीगोंद्यासह कर्जत व जामखेडमधील भाजप कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. त्यामुळे अनेकांनी आता भाजपच्या प्रचारात सक्रीय होण्याऐवजी आता महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा संभाळण्यास अग्रक्रम दिला असल्याची चर्चा सध्या भाजप वर्तुळात सुरु आहे.


उमेदवाराविषयी सध्या भाजपमध्ये नाराजीचे सूर मोठ्या प्रमाणात आहे. नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केलेली आहे. त्यातून नेत्यांची नाराजी दूर झालेली आहे. मात्र कार्यकर्त्यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे अनेकजण अजूनही नाराज आहेत. नाराजातील काहीजणांनी थेट महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा संभाळण्यास सुरवात केलेली आहे.

मागील पाच वर्षे आम्ही पक्षाचे इमाने इतबारे काम केले आहे. मात्र आमच्या ऐवजी आमच्याच नेत्यांनी विरोधकांना जवळ केले. तसेच त्यांना ते बरोबर घेऊन फिरले आहेत. मात्र आज अडचणीच्या वेळेत पाच वर्षे बरोबर असलेली माणसे त्यांच्याबरोबर दिसून येत नाही. आता त्यांना आमची गरज वाटू लागलेली आहे. त्यामुळे ते आम्हाला आता गावातील व नातेवाईकांमार्फत भेटण्यास येण्याचे निमंत्रण पाठवित आहेत. मात्र मागील पाच वर्षात ते काय वागले, हे मात्र ते आठवत नाही.

पाच वर्षात ज्यांना बरोबर घेऊन फिरलात आता त्यांचीच मदत घेऊन प्रचार करा, असा थेट इशाराच काही कार्यकर्ते देऊ लागले आहे. मागील पाच वर्षात आम्ही तुमच्याशी संपर्क साधला मात्र स्वीय सहायकाची फौैज तुमच्या पर्यंत आम्हाला येऊ देत नव्हती. तीच आता स्वीय सहायकाची फौज दिवसरात्र आम्हाला फोन करून भेटायला यायचे आहे, कोठे येऊ असे विचारत आहे.

जेव्हा आम्हाला भेटायची व बोलायची गरज होती. तेव्हा मात्र ते भेटले नाही. मात्र आता ते भेटून बोलायचे म्हणत आहे. नेत्यांची चूक नाही. मात्र स्वीय सहायकाची फौज चुकीची आहे. त्यामुळे अऩेकजण भाजपपासून दूर गेलेले आहे. विशेष करून श्रीगोंद्यासह जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post