नगर ः अहमदनगर शहराला ५०० हून अधिक वर्षाचा इतिहास आहे. हा शहर ऐतिहासिक शहर आहे. हे शहर कोणाची जहागिरी व बक्षीस बहाल केलेला शहर नसून हा अहमद बादशाह याने बसवलेला शहर आहे. या शहराची एक ओळख आहे. परंतु काहीजण आपले हित जोपासण्यासाठी व राजकीय षडयंत्र करण्यासाठी नामांतराचा मुद्दा भाषणातून उपस्थित करीत असून अहिल्यानगर असाही उल्लेख करीत आहे, असे समाजवादी पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
अजीम राजे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्याबाई होळकर यांना कुठल्याही समाजाचा विरोध नसून अहिल्याबाई होळकर यांनी जेथे आपले पराक्रम गाजविले तेथे नामांतर होण्याची गरज आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार आपल्या प्रचारात बॅनर, पॉम्प्लेट, सोशल मीडिया तसेच अनेक ठिकाणी सभेच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी व मतांच्या फायद्यासाठी उमेदवार अहमदनगर शहर ऐवजी अहिल्यानगर असा उल्लेख करत आहे.
दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याची भावना निर्माण करत आहे. त्यामुळे नामांतराचा कुठलाही निर्णय झालेला नसून हे राजकीय षडयंत्र स्वयंघोषित प्रमाणे नामकरण करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर लावणार असाल तर नागरीकांना विचार करावा लागेल व अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी करणार. असल्याचे समाजवादी पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे म्हटले आहे.
Post a Comment