कोणाला कोणते मिळाले खाते वाचा सविस्तर...

नागपूर ः येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवशीच मंत्रीमंडळाला खातेवाटप करण्यात आलेले आहे. नामधारी मंत्र्यांना आता त्यांची खाते मिळालेली असली तरी अनेकांना जे पाहिजे ते खातं न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.


सरकार स्थापन होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतर आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारचे खाते वाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आज फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालेले नव्हते.

हेही पहा एकदा...  सरकारी वाहने धूळखात पडून....

 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर तब्बल बारा दिवसांनी म्हणजे 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. यानंतर दहा दिवसांनी म्हणजे 15 डिसेंबर रोजी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.

आता मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर सहा दिवसांनी मंत्र्यांचे पोर्टफोलिओ जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण झालेला असतानाही खाते वाटप हे जाहीर करण्यात आलं नव्हते. त्यामुळे सबंध हिवाळी अधिवेशनात कोणत्याही पदभार नसलेले मंत्री हे विधीमंडळात हजर होते.

यामुळे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका देखील होत होती. प्रचंड बहुमत मिळाले असतानाही महायुतीचे खातेवाटप जाहीर होत नसल्याने महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

आज महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास) विभागाचे मंत्रीपद देण्यात आले आहे. 

कॅबिनेटमंत्री ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग. उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन, राज्य त्पादन शुल्क. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल. 

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास), हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, चंद्रकात पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री, गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन.

गणेश नाईक – पर्यटन, गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा, दादा भुसे – शालेय शिक्षण, संजय राठोड – माती व पाणी परीक्षण, धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन.

 उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा, जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल. पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, अॅनिमल हसबंडरी, अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी. अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय. 

आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय. अदिती तटकरे – महिला व बालविकास. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम. माणिकराव कोकाटे – कृषी.  जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन. 

संजय सावकारे – कापड. संजय शिरसाट सामाजिक न्याय. प्रताप सरनाईक – वाहतूक. भरत गोगावले रोजगार हमी, फलोत्पादन. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे. आकाश फुंडकर – कामगार. बाबासाहेब पाटील – सहकार. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण. 

राज्यमंत्री ः माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण. आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय.  मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा. इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन.  योगेश कदम – गृहराज्य शहर. पंकज भोयर – गृहनिर्माण.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post