श्रीगोंदे ः जुन्नरजवळच्या १२०० फूट खोल दरती दोन मृतदेह आढळले आहेत. एक महिला व एक पुरुष असे हे दोन मृतदेह आहेत. त्यामुळे या दोन्हींचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहे. दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोकणकडा परिसरात तरूणी आणि एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
मृत व्यक्तींची ओळख पटलेली आहे. श्रीगोंद्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले ४० वर्षीय रमेश सूर्यवंशी व आंबोली (ता. जुन्नर) येथील २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली अशी त्यांची नावे आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.पोलिस व स्थानिक बचाव पथकाने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले.
रमेश सूर्यवंशी हे मूळचे दुर्गावाडीचे रहिवासी होते. सध्या ते श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते, याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी ते हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दुसरीकडे रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. ती बेपत्ताबाबत तिच्या कुटुंबियांनी तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात नोंदविलेला होता.
स्थानिक रहिवाशांना कोकणकडा परिसरातील रिव्हर्स वॉटर फॉलजवळ काही दिवसांपासून एक पांढरी कार उभी असल्याचे दिसले. संशय बळावल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता, कड्याच्या काठावर एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या चपला आढळल्या.
रविवारी (ता. 22 ) दाट धुके व पावसामुळे शोधकार्याला अडथळा आला. सोमवारी (ता. 23) सकाळी बचाव पथकाने दरीत उतरून शोध घेतला, तेव्हा दोन्ही मृतदेह आढळले. बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सरकारी रग्णालयात पाठवले आहेत.
रमेश आणि प्रियंका यांनी आत्महत्या केली, की त्यांचा खून करण्यात आला. याबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.
Post a Comment