अहिल्यानगर ः आंधळं दळतयं अन् कुत्र पीठ खातयं असाच कारभार सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा सुरु आहे. जिल्ह्यातील काही शाळांची कामे नियमबाह्य पध्दतीने केली जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरु आहे.कार्यालयीन कामकाजाच्या गप्पा चहाच्या ठेल्यावर सर्वाधिक होत असल्याची चर्चा जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आहे. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सोळा जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात झालेली आहे. शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे फूल देऊन चाॅकलेटने तोंड गोड करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक व शिक्षकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. पहिला दिवस आनंदात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अनेक चेहऱ्यांवर नाराजीची भावना दिसून आली.
माध्यमिक शिक्षण विभागातील पगार बिलासह मेडिकल बिल, वेतनश्रेणी आदी प्रकरणांच्या कामासाठी देवाण-घेवाण केली जात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ही चर्चा शिक्षण मधील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर काहींनी घालूनही त्यात फरक पडलेला आहे.
दरवर्षीच विविध कामांसाठी आर्थिक देवाण-घेवाण करावी लागत असल्याची चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरु आहे. लिपीकच कोणतेही प्रकरण शिक्षण विभागात घेऊन जाण्याच्या अगोदर आकडा सांगत आहे. त्यामुळे आकड्याचा झोल नेमका कोठून होतो, याची चर्चा सध्या जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरु आहे.
जिल्ह्यातील काही शाळांच्या लिपिकांच्या बाबतीत तक्रारी झालेल्या आहेत. मात्र त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये शिक्षणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही टेबलवरील कर्मचारी नियमबाह्य पध्दतीने कामकाज करीत आहे. याबाबत शिक्षकांच्या तक्रारी आहे. या तक्रारी वरिष्ठांपर्यंत होऊनही त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे. ज्यांच्या तक्रारी आहेत. त्यांचे टेबल बदलण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
शिक्षकांचे काही बिले मुख्यालयातून मंजूर करून आणायचे असतील तो जाण्या-येण्याचा खर्च काही लिपीक शिक्षकांकडून घेत असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. (क्रमशः)
Post a Comment