अहिल्यानगर : पूर्वी लग्न जमविणं हे एक सामाजिक व धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र काम मानले जायचे. गावात किंवा कुटुंबातील ज्येष्ठ लोक, नातलग, मित्रमंडळी आपल्याच ओळखीच्या लोकांमध्ये जुळवाजुळव करत असत.
पण हल्लीच्या काळात, हे सगळं बरंच बदलल आहे. आता मॅट्रीमोनियल एजन्सीज, ऑनलाइन पोर्टल्स, व खास एजंट्स यांचा उदय झाला आहे. यामुळे हे पुण्यकार्य एकप्रकारे व्यवसाय बनले आहे. एजंट पैसे घेऊन जुळवाजुळव करतात, त्यांचं नेटवर्क वापरून स्थळं दाखवतात.
पण मुली कमी असल्याची कारणे देऊन एजंट आता फसवणूक करू लागले आहे. एकाच मुलीचा बायोडाटा अनेक ठिकाणी दाखवून पालकांना लूटत आहे. विशेष म्हणजे बायोडाटातील मुलींचे लग्न झालेले असते.
काहीजण विवाह संस्थानच्या एका माध्यमातून स्वत:ची प्रसिध्दी करून घेत आहेत. विवाह जमविल्याचे खोटे आकडे प्रसिध्द करून प्रकाशझोतात राहात आहे. या माध्यमातून स्वतन:ला पुरस्कार मिळवून घेत आहेत. पालकांना मोठ्या मोठ्या गप्पा मारून हेलपाटे मारयला लावत आहेत.
विवाह संस्थांचा काही अंशी याचा फायदा झाला आहे. कारण आता स्थळं अधिक वेगाने मिळतात, पारंपरिक ओळख नसली तरी चांगल्या जुळणाऱ्या जोड्या तयार होतात. पण काही वेळा या व्यवसायात फसवणूक, चुकीची माहिती देणे, किंवा फक्त पैशासाठी स्थळ दाखवणं असंही घडते.
मुलीची खोटी माहिती देऊन, बनावट लग्न करून मुलगा व त्याच्या कुटुंबियांना फसवणं हे देखील वाढलं आहे. हे फार चिंताजनक आहे कारण यात फसवणूक, मानसिक त्रास, आर्थिक लुट आणि सामाजिक बदनामी यांचा मोठा धोका असतो.
एजंट किंवा मुलीकडून तिच्या शिक्षण, नोकरी, कुटुंबाची सामाजिक व आर्थिक स्थिती याबद्दल खोटी माहिती सांगितली जाते. सुंदर फोटो, श्रीमंती दाखवणारे फोटो, मोठ्या इव्हेंटमधले फोटो वापरले जातात.कधी कधी सोशल मीडियावरून नकली प्रोफाइल तयार करून विश्वास निर्माण केला जातो.
काही वेळा लग्नापूर्वीच “मुलीच्या इच्छेनुसार खर्च, मुलीच्या आवडीचे दागिने, मोठं रिसेप्शन यासाठी पैशांची मागणी केली जाते. लग्न झाल्यावर मुलीची खरी पार्श्वभूमी कळते: शिक्षण नसलेली, कर्जबाजारी कुटुंब, मानसिक समस्या असलेली किंवा लग्नपूर्वीचे संबंध असलेले प्रकार समोर येतात. काही मुली काही वेळा एका पाठोपाठ एक लग्नं करून, प्रत्येक वेळेस पैसे घेऊन नातं तोडतात.
मुलीची व कुटुंबाची पार्श्वभूमी नीट तपासा. त्यांच्या नातेवाईकांशी बोलणे, शेजारी, गावातली माहिती गोळा करावी. शिक्षण व नोकरीचे अधिकृत कागदपत्रे तपासणे. मुलगी व तिच्या कुटुंबाशी वेळ घालवणं गरजेचे आहे.केवळ फोटो, फोनवर बोलणे यावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष भेटी घ्या. कायदेशीर नोंदणी असेल तर भविष्यात कायदेशीर उपाय शक्य होतो. लग्नाच्या खर्चात अतीशयोक्ती टाळा. भावनिक मोह टाळून व्यावहारिक निर्णय घ्या.
Post a Comment